<p style="text-align: justify;"><strong>India Vs England 3rd Test :</strong> तिसरा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. रोहित शर्माने दुसऱ्या डावात 59 धावा केल्या होत्या. रोहितच्या खेळीमुळे टीम इंडिया सामन्यात पुनरागमन करताना दिसत होती. रोहित शर्माने मात्र आपल्या शतकापेक्षा संघ अधिक महत्वाचा असल्याचे म्हटले आहे.</p> <p style="text-align: justify;">रोहित शर्मा म्हणतो की शतकाचा विचार त्याच्या मनात शेवटी येतो. तो म्हणाला, "शतक ही शेवटची गोष्ट आहे, ज्याबद्दल मी शेवटी विचार करतो. माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे संघाला चांगल्या स्थितीत कसे ठेवायचे. शतक झळकावले पण संघाचा विजय सर्वात महत्वाचा आहे.</p> <p style="text-align: justify;">रोहित शर्माने म्हटले आहे की, पुजाराचा इंग्लंडविरुद्धचा डाव त्याच्या अस्तित्वासाठी नव्हता. आमचा हेतू स्कोर करणे होता आणि पुजाराने ते स्पष्टपणे दाखवले. जेव्हा तुम्ही शॉटच्या हेतूने फलंदाजी करता तेव्हा मदत मिळते."</p> <p style="text-align: justify;"><strong>टीम इंडियाची फलंदाजी पहिल्या डावात खराब </strong><br />रोहित शर्मा पुढे म्हणाला, की "तिथं जाऊन फलंदाजी करणे सोपे नाही. जेव्हा तुम्ही 300 धावांनी पिछाडीवर असाल आणि पुजारा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्यावरून हे दिसून येते की प्रत्येक खेळाडूचे चरित्र आणि मानसिकता काय आहे."</p> <p style="text-align: justify;">रोहितने कबूल केले की भारताने पहिल्या डावात अत्यंत खराब फलंदाजी केली जेथे ते 78 धावांवर ऑलआऊट झाले. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 432 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद 215 धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा 91 धावांवर नाबाद परतला.</p>
from sports https://ift.tt/3BmXD0u






0 Comments